सिंधुदुर्ग जिल्ह्याला "ऑरेंज अलर्ट", वादळी पावसाची शक्यता - जिल्हाधिकारी

आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज


सिंधुदुर्ग : उत्तर कर्नाटक-गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने "ऑरेंज अलर्ट" जारी केला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तरीही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.



पावसाचा जोर कायम


जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम आहे बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५६.७० मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाउस वेंगुर्ले तालुक्यात ८० मिमी पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी घर-गोठे यांची पडझड होऊन बुधवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार एकूण ५ लाख ७१ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाल्याही माहिती आपत्ती विभागातून देण्यात आली. बुधवारी दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. दरम्यान समुद्र खवळला असल्यान अनेक नौका सुरक्षेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. या पावसामुळे महावितरणाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तो सुरु करण्यासाठी महावित्रांचे काम्राचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे क्काही काल वाहतूक ठप्प झाली होती. पण नंतर हि दरड बाजूला करण्यात आली. आता वाहतूक सुरुव्लीत सुरु आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या