आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक

मुंबई : एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात दोन फरार आरोपींना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. हे दोघेही बंदी घातलेल्या आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉडेलचे सदस्य आहेत. अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. अटक केलेले दोघे इंडोनेशियातील जकार्तात अनेक महिन्यांपासून लपले होते. तिथून भारतात परतताच त्यांना विमानतळावरून अटक करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच एनआयएने अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दोन्ही आरोपींची ठोस माहिती देणाऱ्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात आधीच आयएसआयएसशी संबंधित आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेतील सर्व आरोपींवर देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकारविरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आरोपींवर आहे.

अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके तयार केली होती. ही स्फोटके तयार करण्यासाठी त्याने २०२२ - २३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. पुण्यात तयार केलेल्या स्फोटकांची फैयाज शेख याने चाचणीही केली होती.

एनआयएने मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलमया आरोपींविरुद्ध यूएपीए, स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे.
Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह