आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक

मुंबई : एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात दोन फरार आरोपींना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. हे दोघेही बंदी घातलेल्या आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉडेलचे सदस्य आहेत. अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. अटक केलेले दोघे इंडोनेशियातील जकार्तात अनेक महिन्यांपासून लपले होते. तिथून भारतात परतताच त्यांना विमानतळावरून अटक करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच एनआयएने अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दोन्ही आरोपींची ठोस माहिती देणाऱ्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात आधीच आयएसआयएसशी संबंधित आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेतील सर्व आरोपींवर देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकारविरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आरोपींवर आहे.

अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके तयार केली होती. ही स्फोटके तयार करण्यासाठी त्याने २०२२ - २३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. पुण्यात तयार केलेल्या स्फोटकांची फैयाज शेख याने चाचणीही केली होती.

एनआयएने मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलमया आरोपींविरुद्ध यूएपीए, स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे.
Comments
Add Comment

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे