अकोले तालुक्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अकोले : अकोले तालुक्यातील बहुतांश भागात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साठले होते.अकोले शहर व परिसरात दुपारच्या वेळी एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला.आढळा व प्रवरा विभागात सर्वदूर धुव्वाधार पाउस कोसळला.


आढळा विभागातील समशेरपुर ,टाहाकारी, सावरगाव पाट,देवठाण, तांभोळ,विरगाव, पिंपळगाव निपाणी,हिवरगाव ,डोंगरगाव ,गणोरे, या गावासह प्रवरा पट्ट्यातील विठे ते कळस पट्ट्यातील सर्व गावांतही दुपारी धो- धो पाऊस कोसळला. सुमारे तास- दिड तास पाउस सूरू असल्याने रस्त्यावर व शेतांमध्ये पाणीच पाणी साठले होते. ओढे नाले यांचे पाणी नदीला मिळत आहे.त्यामुळं प्रवरा नदी पात्र वाहते झाले आहे.मुळा विभागातील काही गावांत अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.तर आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह,शाळा खोल्या, ग्रामपंचायत इमारत,घरे, जनावरांचे गोठे,रस्त्यांचे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे आदिवासी विभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या परीसरात गारठा निर्माण झाला आहे.जोरदार पावसामुळे खराब झालेले शिरपुंजे ग्रामपंचायतचे पत्रे यापूर्वी दोन वेळेस दुरुस्त करण्यात आले होते. त्यांनतरही दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पत्रे वाकले आहेत. लोखंडी पोलही वाकले आहेत.असे येथील सामजिक कार्यकर्त्यांनी कळविले आहे.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत च्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.चार पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे या परिसरातील अनेक घरे, जनावरांचे गोठे , रस्त्यांचे नुकसान झाले आहे.अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये विशेषत्वाने पश्चिम विभागामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.



यासंबंधी शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले यांनी केली आहे.दरम्यान शिर्डी लोकसभेचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पत्र व्यवहार करून व दूरध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई संदर्भात माहिती दिली असून अकोले तालुक्यात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव यांनी दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पंचनामे करण्यासंदर्भात अवकाळी संदर्भात माहिती दिली असल्याचे एकनाथ यादव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात