बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा; किनारपट्टी भाग सतर्क

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ या चक्रीवादळाच्या निर्माणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १६ ते १८ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. हे वादळ २३ ते २८ मेच्या दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल व बांगलादेशाच्या किनारपट्टी भागांना धडकू शकते.


हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण पूर्व किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


या संभाव्य वादळामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रात उंच लाटा उठण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत माहितीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे