बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा; किनारपट्टी भाग सतर्क

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ या चक्रीवादळाच्या निर्माणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १६ ते १८ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. हे वादळ २३ ते २८ मेच्या दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल व बांगलादेशाच्या किनारपट्टी भागांना धडकू शकते.


हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण पूर्व किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


या संभाव्य वादळामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रात उंच लाटा उठण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत माहितीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ