उन्हाळी सुट्टीसाठी चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट

चिपळूण : उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने चाकरमान्यांनी कोकणची वाट धरल्याने कोकण रेल्वे हाऊस फुल्ल झाली आहे. कोकणाकडे येणाऱ्या अनेक गाड्या मोठ्या प्रमाणावर भरुन येत असल्याने कोकणातील सर्वच रेल्वे स्थानके आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेकांची गैरसोय झाली. याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे घेतले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.



येत्या १७ मेपर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मागील वर्षीच्या मानाने कोकण रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या कमी असल्याने चाकरमान्यांना आता एसटी आणि खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच काही चाकरमानी स्वतःच्या खासगी वाहनाने कोकण गाठल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. कोकण रेल्वे, एसटी गाड्याचे आरक्षण उपलब्ध होत नसल्याने अनेकांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक प्रवाशांच्या गरजेचा फायदा उठवत असल्याने ७०० रुपये भाडे असलेल्या ठिकाणी १ हजार ते १५०० रु. भाडे आकारणी करत आहेत.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी