मुंबईकरांची कचऱ्यापासून होणार सुटका

कचऱ्यांच्या गाड्यांसंदर्भात नवीन कंत्राट


मुंबई (वार्ताहर) : कचरा वाहून नेणाऱ्या हिरव्या रंगाच्या गाड्यांच्या जागी आता नव्या रंगसंगतीच्या कचरागाड्या येत्या काही महिन्यात रस्त्यावर दिसणार आहे. मुंबई महापालिकेने कचऱ्याच्या गाड्यांसदर्भात नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. नव्याने मेणारी वाहने मागील बाजूने झाकलेली असतील. तसेच कचऱ्यातून निघणारे पाणी साठवण्यासाठी यात स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यामुळे रस्त्यावर पाणी सांडणार नाही, या नवीन गाड्यांची सेवा लवकरच मुंबई महापालिका घेणार आहे.


यामुळे कचरागाडांवर कचरा उचलून टाकणाऱ्या मोटर लोडरला काम उरणार नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील कचरा झाडण्याचे काम दिले आहे. त्यालाही कामगार संघटनांनी विरोध केला आहे. कचरा संकलन व परिवहन हे अत्यंत महत्त्वाचे काम जर कंत्राटदारांकडून करून घेण्यात आले तर पालिकेला सर्वस्वी कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागणार आहे. प्रस्तावित योजनेमुळे मोटर लोडर कामगारांचे हक्क बाचित होणार नाहीत अथवा त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. या कामगारांचे सर्व प्रकारचे आर्थिक लाभ अबाधित राहण्यासोबतच त्यांच्या वारसा हक्कास (पी. टी. केस) बाधा येणार नाही.


तसेच, महापालिकेचे सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही यानगृह (गॅरेज) बंद केले जाणार नाहीत. - डॉ. अश्विनी जोशी, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सफेदसह पिवळ्या रंगाच्या गाड्या एकूण वाहनांपैकी सुमारे १० ते १५ टक्के याहने इलेक्ट्रिक स्वरुपाची असणार आहेत. कचरा उचलणे, कचरा पेटीची निगा, परिरक्षण, परिवहन आदी कामासाठी एकच यंत्रणा कार्यरत राहणार आहे. ओला कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये कचऱ्यांतून निघणारे सांडपाणी वाहनावच साठविण्याची व्यक्स्था असेल. परिणामी, रस्त्यावर पाणी सांडणार नाही तसेच दुर्गधीही पसरणार नाही. नंतर, या सांडपाण्याची क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Garib Nagar Demolition Day 2 : मोठी बातमी! वांद्र्यातील गरीब नगरमध्ये तणाव; पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज, कारवाई मात्र सुरूच राहणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Bandra East) परिसरातील 'गरीब नगर' (Garib Nagar) भागात सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातावरण पाहायला