शस्त्रसंधी झाली पण सायबर हल्ले सुरुच! भारतावर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले

मुंबई : शस्त्रसंधी करुन पाकिस्तानसोबत लष्करी तणाव कमी करण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी भारतावर सायबर हल्ल्यांचा मारा सुरूच आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. फक्त एप्रिल २२ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले झाले असून, त्यापैकी १५० हल्ले यशस्वी ठरले.


सायबर हल्ल्यांमागे पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि मध्यपूर्वेतील देशांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरी, विमान आणि महापालिकेच्या यंत्रणा हॅक, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हल्ला अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



फेक न्यूजविरोधात मोहिम सुरू


'नेशन फर्स्ट, फॅक्ट फर्स्ट' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सायबरने सोशल मीडियावरील ८३ बनावट पोस्ट्सपैकी ३८ पोस्ट हटवल्या आहेत. भारतीय लष्कर व सरकारविरोधात फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.



सायबर फ्रॉडविरोधात हेल्पलाइन सक्रिय


ऑनलाईन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी १९३० आणि १९४५ या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या असून, दररोज ७,००० हून अधिक कॉल्स येत आहेत. तातडीने प्रतिसाद देणाऱ्या १०० लाईन्स या नंबरवर काम करत आहेत. २०१९ पासून सायबर फ्रॉडमधून तब्बल ₹६०० कोटी वाचवले गेले असून, केवळ मागील सहा महिन्यांतच ₹२०० कोटींची बचत झाली आहे.



सायबर गुलामगिरीतून सुटका


सायबर क्राईमच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. लाओसमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सहा तरुणांची सुटका करण्यात आली आहे. या तरुणांना वीजेचे झटके देणे, नखे उपटणे अशा अमानुष छळाचा सामना करावा लागत होता.



CA विद्यार्थ्याकडून धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट


दरम्यान, इंदोरमधून ३९ वर्षीय CA विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तो २०२१ पासून सात सोशल मीडियावर हिंदू देवतांविषयी अपमानास्पद पोस्ट करत होता. ही बाब राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Comments
Add Comment

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण

Budget 2026 : कोकणचा काजू-नारळ सातासमुद्रापार जाणार! अर्थमंत्र्यांचा 'हाय-व्हॅल्यू' शेतीवर भर; कोकणकर होणार मालामाल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या