शस्त्रसंधी झाली पण सायबर हल्ले सुरुच! भारतावर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले

  57

मुंबई : शस्त्रसंधी करुन पाकिस्तानसोबत लष्करी तणाव कमी करण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी भारतावर सायबर हल्ल्यांचा मारा सुरूच आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. फक्त एप्रिल २२ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले झाले असून, त्यापैकी १५० हल्ले यशस्वी ठरले.


सायबर हल्ल्यांमागे पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि मध्यपूर्वेतील देशांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरी, विमान आणि महापालिकेच्या यंत्रणा हॅक, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हल्ला अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



फेक न्यूजविरोधात मोहिम सुरू


'नेशन फर्स्ट, फॅक्ट फर्स्ट' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सायबरने सोशल मीडियावरील ८३ बनावट पोस्ट्सपैकी ३८ पोस्ट हटवल्या आहेत. भारतीय लष्कर व सरकारविरोधात फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.



सायबर फ्रॉडविरोधात हेल्पलाइन सक्रिय


ऑनलाईन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी १९३० आणि १९४५ या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या असून, दररोज ७,००० हून अधिक कॉल्स येत आहेत. तातडीने प्रतिसाद देणाऱ्या १०० लाईन्स या नंबरवर काम करत आहेत. २०१९ पासून सायबर फ्रॉडमधून तब्बल ₹६०० कोटी वाचवले गेले असून, केवळ मागील सहा महिन्यांतच ₹२०० कोटींची बचत झाली आहे.



सायबर गुलामगिरीतून सुटका


सायबर क्राईमच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. लाओसमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सहा तरुणांची सुटका करण्यात आली आहे. या तरुणांना वीजेचे झटके देणे, नखे उपटणे अशा अमानुष छळाचा सामना करावा लागत होता.



CA विद्यार्थ्याकडून धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट


दरम्यान, इंदोरमधून ३९ वर्षीय CA विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तो २०२१ पासून सात सोशल मीडियावर हिंदू देवतांविषयी अपमानास्पद पोस्ट करत होता. ही बाब राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली