नागपुरात खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून ५ जणांचा मृत्यू

नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एका जुन्या खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. मृतांची नावे अद्याप कळली नसली तरी हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पुढे आली असून हा अपघात आहे की सामूहिक आत्महत्या ? याबाबत संभ्रम आहे.

नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात सुरगाव शिवार येथील जुन्या खाणीच्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव पथकाचे मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे. अर्थातच ही अचानक घडलेली घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुही पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात