शिर्डी दर्शनासाठी निघालेले... पण स्वप्नातही नकोसा अपघात! दोन ठार, पाच जखमी

  39

सोलापूर : शिर्डी दर्शनासाठी हैदराबादहून निघालेल्या भाविकांच्या कारला बारसवाडा फाट्यावर भीषण अपघात झाला. विना नंबरच्या भरधाव हायवाने समोरून धडक दिली आणि दोन भाविक दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.


ही घटना रविवार, ११ मे रोजी मध्यरात्री ११.३० वाजता धुळे–सोलापूर महामार्गावर घडली. धडक इतकी जोरात होती की जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह आणि जखमींना कारमधून बाहेर काढावं लागलं.


मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जी रामू (वय ४५) जी माधुरी (वय ४०) दोघेही राहणारे हैद्राबाद यांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीवाणी ४१, अनुषा १७, मेघना १२, ऋषिका ०७, नागेश्वर राव ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



भाविक कुटुंब "किया कॅरेन्स" गाडीने (टीजी ०८ क्यू ०५५८) शिर्डीकडे रविवारी दुपारी १२ वाजता निघाले होते. बारसवाडा फाट्याजवळ आले असताना भरधाव वेगात आलेल्या विना नंबर हायवाने थेट समोरून धडक दिली.


अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, तर महामार्ग रुग्णवाहिका १०३३ ने जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या