शिर्डी दर्शनासाठी निघालेले... पण स्वप्नातही नकोसा अपघात! दोन ठार, पाच जखमी

सोलापूर : शिर्डी दर्शनासाठी हैदराबादहून निघालेल्या भाविकांच्या कारला बारसवाडा फाट्यावर भीषण अपघात झाला. विना नंबरच्या भरधाव हायवाने समोरून धडक दिली आणि दोन भाविक दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.


ही घटना रविवार, ११ मे रोजी मध्यरात्री ११.३० वाजता धुळे–सोलापूर महामार्गावर घडली. धडक इतकी जोरात होती की जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह आणि जखमींना कारमधून बाहेर काढावं लागलं.


मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जी रामू (वय ४५) जी माधुरी (वय ४०) दोघेही राहणारे हैद्राबाद यांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीवाणी ४१, अनुषा १७, मेघना १२, ऋषिका ०७, नागेश्वर राव ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



भाविक कुटुंब "किया कॅरेन्स" गाडीने (टीजी ०८ क्यू ०५५८) शिर्डीकडे रविवारी दुपारी १२ वाजता निघाले होते. बारसवाडा फाट्याजवळ आले असताना भरधाव वेगात आलेल्या विना नंबर हायवाने थेट समोरून धडक दिली.


अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, तर महामार्ग रुग्णवाहिका १०३३ ने जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद