शिर्डी दर्शनासाठी निघालेले... पण स्वप्नातही नकोसा अपघात! दोन ठार, पाच जखमी

सोलापूर : शिर्डी दर्शनासाठी हैदराबादहून निघालेल्या भाविकांच्या कारला बारसवाडा फाट्यावर भीषण अपघात झाला. विना नंबरच्या भरधाव हायवाने समोरून धडक दिली आणि दोन भाविक दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.


ही घटना रविवार, ११ मे रोजी मध्यरात्री ११.३० वाजता धुळे–सोलापूर महामार्गावर घडली. धडक इतकी जोरात होती की जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह आणि जखमींना कारमधून बाहेर काढावं लागलं.


मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जी रामू (वय ४५) जी माधुरी (वय ४०) दोघेही राहणारे हैद्राबाद यांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीवाणी ४१, अनुषा १७, मेघना १२, ऋषिका ०७, नागेश्वर राव ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



भाविक कुटुंब "किया कॅरेन्स" गाडीने (टीजी ०८ क्यू ०५५८) शिर्डीकडे रविवारी दुपारी १२ वाजता निघाले होते. बारसवाडा फाट्याजवळ आले असताना भरधाव वेगात आलेल्या विना नंबर हायवाने थेट समोरून धडक दिली.


अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, तर महामार्ग रुग्णवाहिका १०३३ ने जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे