जगातील सर्वात मोठ्या गोवर्धन गोशाळेचा आज दिमाखदार शुभारंभ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित


कणकवली : करंजेच्या माळरानावर उभे झालेले नंदनवन म्हणजे कै. तातु सिताराम राणे ट्रस्ट संचलीत गोवर्धन गोशाळा! या गोशाळेचा दिमाखदार शुभारंभ रविवारी ११ मे रोजी होत आहे. या पार्श्वभुमीवर दुपारी १ वाजता विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.


गोवर्धन गोशाळेच्या परिसरातच हेलीपॅडही उभे करण्यात आले असून सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हिरव्या वनराईने नटलेल्या, निसर्गरम्य करंजे गावात सुमारे ७० एकर जागेत ही अत्याधुनिक ‘गो-शाळा’ उभारण्यात आली असून त्यामध्ये गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर आदी भारतातील व महाराष्ट्रातील विविध जातींच्या तसेच खिल्लार, स्थानिक कोकण कपिला अशा विविध गाई ठेवण्यात आल्या आहेत. या गोशाळेत दूधापासून विविध पदार्थ, उत्पादने, तयार करण्यात तसेच त्याची विक्री करण्यात येणार आहे. तसेच गोमूत्रा पासून औषधे व खत, गोबरगॅस, आणि रंग तयार करण्यात येणार आहेत.



गो शाळेसोबतच शेळी -मेंढी पालन,कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे करंजे व आसपासच्या गावांतील तरुण -तरुणीना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेलच, शिवाय या ठिकाणी पशुपालन,दुग्ध व्यवसाय, शेळी -मेंढी पालन, कुक्कुट पालन खत निर्मिती,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयावर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये तज्ञांमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे. या शाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी होणार आहे. गो- शाळेला जोडूनच भाकड गाई सांभाळण्यासाठी एक भव्य शेड उभारण्यात येत आहे.


या गोशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राणे परिवाराच्या वतीने खा. नारायण राणे , सौ. निलमताई राणे, सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे, कु. अभिराज निलेश राणे, कु. निमिश नितेश राणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण