Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले असून या आकर्षक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सुंदर सजावटीची एक झलक पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत आहेत.


संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातून हजारो भाविक गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येत आहेत. भक्तीमय वातावरणात गणरायाच्या दर्शनाचा आनंद भाविक घेत असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात यंदा विशेष फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांनी साकारलेली ही आरास अत्यंत मनमोहक आणि देखणी आहे. या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.


संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होत असून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. दूरदूरवरून आलेले भाविक गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावताना दिसत आहेत.


'या' चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते


गणेशाला विघ्नहर्ता आणि पहिले पूजनीय दैवत मानले जातात. संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. हा एक विशेष उपवास असून तो गणेशाला समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास करून भगवान गणेशाची पूजा करतात. सूर्यास्तानंतर चंद्राला प्रार्थना करून हा उपवास संंपन्न होतो. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. हा उपवास केल्याने जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होतात.

Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी