भारत - पाकिस्तान शस्त्रसंधी करुन चर्चा करणार

वॉशिंग्टन डी. सी. : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करुन चर्चेची तयारी दाखवली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ या अमेरिकेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा केला आहे. सलग अनेक तास केलेल्या चर्चेअंती तोडगा काढण्यात यशस्वी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.




याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांची नाव आणि धर्म विचारुन हत्या केली. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी होता. यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात ७ ते १० मे दरम्यान प्रत्येक रात्री संघर्ष सुरू होता. यानंतर १० मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होत असल्याचा दावा केला. शस्त्रसंधी होत असल्याचे पाकिस्तानकडूनही जाहीर करण्यात आले. भारताने शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला असून चर्चा करणार असल्याचे सांगितले.


पाकिस्तानच्या डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने भारताच्या डीजीएमओंना फोन करुन चर्चेसाठी आमंत्रित केले. तसेच जमीन, आकाश आणि पाणी अशा सर्वच ठिकाणी शस्त्रसंधी करत असल्याचे पाकिस्तानच्या डीजीएमओने जाहीर केले. यानंतर पाकिस्तान हल्ला करणार नसेल तर भारत प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही, असे भारताकडून सांगण्यात आले. लष्करी संकेतानुसार पाकिस्तानच्या डीजीएमओकडून आलेले चर्चेचे आमंत्रण भारताच्या डीजीएमओने स्वीकारले आहे. चर्चा कोणत्या मुद्यांवर होणार, कोणत्या अटी - शर्तींच्या आधारे होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जर डीजीएमओ पातळीवरील चर्चा यशस्वी झाली तर सीमेवर शांतता नांदेल पण चर्चा अयशस्वी झाल्यास काय होणा या प्रश्नाचे उत्तर १२ मे रोजी होणार असलेल्या चर्चेअंती मिळेल.





सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच राहणार ?


सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित राहणार की पुन्हा पूर्ववत केला जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भारत सरकारने या संदर्भात कोणतीही नवी घोषणा केलेली नाही. यामुळे सध्या तरी कागदोपत्री सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच आहे.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा