भारत - पाकिस्तान शस्त्रसंधी करुन चर्चा करणार

वॉशिंग्टन डी. सी. : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करुन चर्चेची तयारी दाखवली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ या अमेरिकेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा केला आहे. सलग अनेक तास केलेल्या चर्चेअंती तोडगा काढण्यात यशस्वी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.




याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांची नाव आणि धर्म विचारुन हत्या केली. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी होता. यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात ७ ते १० मे दरम्यान प्रत्येक रात्री संघर्ष सुरू होता. यानंतर १० मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होत असल्याचा दावा केला. शस्त्रसंधी होत असल्याचे पाकिस्तानकडूनही जाहीर करण्यात आले. भारताने शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला असून चर्चा करणार असल्याचे सांगितले.


पाकिस्तानच्या डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने भारताच्या डीजीएमओंना फोन करुन चर्चेसाठी आमंत्रित केले. तसेच जमीन, आकाश आणि पाणी अशा सर्वच ठिकाणी शस्त्रसंधी करत असल्याचे पाकिस्तानच्या डीजीएमओने जाहीर केले. यानंतर पाकिस्तान हल्ला करणार नसेल तर भारत प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही, असे भारताकडून सांगण्यात आले. लष्करी संकेतानुसार पाकिस्तानच्या डीजीएमओकडून आलेले चर्चेचे आमंत्रण भारताच्या डीजीएमओने स्वीकारले आहे. चर्चा कोणत्या मुद्यांवर होणार, कोणत्या अटी - शर्तींच्या आधारे होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जर डीजीएमओ पातळीवरील चर्चा यशस्वी झाली तर सीमेवर शांतता नांदेल पण चर्चा अयशस्वी झाल्यास काय होणा या प्रश्नाचे उत्तर १२ मे रोजी होणार असलेल्या चर्चेअंती मिळेल.





सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच राहणार ?


सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित राहणार की पुन्हा पूर्ववत केला जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भारत सरकारने या संदर्भात कोणतीही नवी घोषणा केलेली नाही. यामुळे सध्या तरी कागदोपत्री सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान