युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता हवाई प्रवासावरही दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोने १४ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर अतिरिक्त इंधन अधिभार (फ्यूल सरचार्ज) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकिटांसोबत ४२५ ते २३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नियम १४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होणार असून त्या वेळेनंतर केलेल्या सर्व नवीन बुकिंगवर हा इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जेट इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे परिचालन खर्च वाढल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे.


कंपनीच्या मते, भारत आणि भारतीय उपखंडातील विमानप्रवासासाठी ४२५ रुपये इतका इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेकडील उड्डाणांसाठी हा अधिभार ९०० रुपये असेल. तसेच दक्षिण-पूर्व आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील उड्डाणांसाठी १८०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. युरोपकडे जाणाऱ्या विमानप्रवासासाठी प्रवाशांना २३०० रुपये इतका इंधन अधिभार भरावा लागणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवरील प्रवास अधिक महाग होण्याची शक्यता आहे.


एअरलाइन कंपन्यांच्या एकूण खर्चात एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) म्हणजेच जेट इंधनाचा मोठा वाटा असतो. इंडिगोच्या मते, एटीएफचा हिस्सा एअरलाइनच्या एकूण परिचालन खर्चाच्या सुमारे ४० टक्के असतो. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे या इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या जेट फ्यूल मॉनिटरनुसार या प्रदेशात इंधनाच्या किमती ८५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.


कंपनीने असेही सांगितले की, इंधनाच्या वाढत्या किमतींचा संपूर्ण परिणाम थेट तिकिटांच्या भाड्यात जोडला असता तर विमानप्रवास आणखी महाग झाला असता. त्यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी ठेवण्यासाठी मर्यादित स्वरूपात इंधन अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, इंडिगोच्या आधी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनीही विमान तिकिटांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता भारतातील हवाई प्रवासावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आगामी काळात मध्य पूर्वेतील परिस्थिती कायम राहिली तर विमानप्रवासाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह