दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था

ऑपरेशन सिंदूर नंतर घेण्यात आला निर्णय


नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर' नंतर राजधानी दिल्लीसह देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळांवर, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने आज, बुधवारी पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर एअर स्ट्राईक केला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले असून स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते. पाकिस्तानला यशस्वी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारताने विविध शहरांमध्ये अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दल तैनात केले आहेत.


दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही प्रमुख ठिकाणी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा पथके महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवून आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर