दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था

ऑपरेशन सिंदूर नंतर घेण्यात आला निर्णय


नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर' नंतर राजधानी दिल्लीसह देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळांवर, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने आज, बुधवारी पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर एअर स्ट्राईक केला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले असून स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते. पाकिस्तानला यशस्वी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारताने विविध शहरांमध्ये अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दल तैनात केले आहेत.


दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही प्रमुख ठिकाणी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा पथके महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवून आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि