पाक दहशतवाद्यांना धडा शिकविला याचा आम्हाला सार्थ अभिमान : खा.नारायण राणे

कोकणात भारत मातेचा जल्लोष


कणकवली : पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते उध्वस्थ करत त्यांना धडा शिकविला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. त्यांनी पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले, त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आजची घटना ही आनंदाची व समाधानाची असून अशावेळी आपण सर्वांनी पंतप्रधानानी भारत मातेचे रक्षण चांगल्या प्रकारे करावे यासाठी त्यांच्या पाठीशी रहावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले.


भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर या शौर्याला वंदन करण्यासाठी येथील प्रहारभवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खा. राणे बोलत होते.


भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अड्यांवर केलेल्या कारवाईचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपणा प्रत्येक भारतीयाला पंतप्रधानांच्या या कृतीबद्दल अभिमान आहे, हे दाखविण्याची ही वेळ आहे. आपण सर्वांनी छोट्या-छोट्या सभा घेत प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन करावे, भारत मातेचे, देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे दाखवून द्या, असे आवाहनही श्री. राणे यांनी केले.



खा. राणे म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने भारत सुन्न झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री पाक व्याप्त कश्मिरमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दशतवाद्यांची स्थळे उद्ध्वस्त केली. पाक पुरस्कृत दशतवादाला मुहतोड जबाब दिला. पाक पुरस्कृत दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे, ही बाब देशावीसायांसाठी गर्वाची आणि अभिमानाची आहे. राष्टलहितासाठी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा पाठिशी देशवासीयांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे राणेंनी सांगितले.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या