मुंबईसह ठाणे, पालघर भागांत हलक्या सरी कोसळल्या

मुंबई : मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहरात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. याचबरोबर राज्यातील इतर भागातही सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली. वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.



दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला असून त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे