India Strikes: भारताचे 'ऑपरेशन सिंदूर', ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक

नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करताना मंगळवारी रात्री दीड वाजता ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. तीनही सैन्य दलांचे हे एकत्रित ऑपरेशन होते. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य केले होते.

भारताच्या गुप्तचर विभागाने सर्व टार्गेटची ओळख केली होती. यानंतर संपूर्ण प्लानिंगसह लष्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि आंतरराष्टीय सीमेपासून किती दूर आहेत ही ठिकाणे...

बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी दूर स्थित आहे. येथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. हा तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केला आहे.

मुरीदके - हे दहशतवादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेपासून ३० किमी अंतरावर आहे. येथे लष्कर ए तौयबाचे शिबीर होते. याचा संबंध २६/११ मुंबई हल्ल्याशी होता

गुलपूर - हे दहशतवादी ठिकाण locपासून ३५ किमी अंतरावर आहे.

लष्कर कँप सवाई - हे दहशतवादी ठिकाणी पीओके तंगधार सेक्टरच्या आत ३० किमी आहे.

बिलाल कँप - जैश ए मोहम्मदचे लाँच पॅड. हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमापार पाठवण्यासाठी वापरले जात होते.

कोटली - एलओसीपासून १५ किमी दूर स्थित लष्कराचे हे शिवीर. या ठिकाणी ५० हून अधिक दहशतवाद्यांची क्षमता होती.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर