Ind vs Pak: भारतीय लष्कर-हवाईदल आणि नौदलाची संयुक्त कारवाई आहे 'ऑपरेशन सिंदूर'...पाकला घरात घुसून ठोकले

नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधातील आपल्या लढाईला नवे वळण देताना ऑपरेशन सिंदूर लाँच केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ऑपरेशन सिंदूर हे लष्कर, हवाईदल आणि नौदलाचे संयुक्त ऑपरेशन होते. यात दहशतवादी शिबीरांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.


या ऑपरेशनमध्ये भारताच्या हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके स्थित ९ दहशतवादी ठिकाणांनार स्ट्राईक केला. ही कारवाई रात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. हा एअरस्ट्राईक बहावलपूर, कोटली आणि मुझ्झफराबादमध्ये करण्यात आला.



भारताच्या स्ट्र्राईकनंतर पाकिस्तानचे उत्तर


भारताच्या एअरस्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विधान समोर आले आहे. शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की पाकिस्तानच्या जमिनीवर पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले. पंतप्रधान शरीफ म्हणाले, पाकिस्तानला या कृत्याचे शक्तीशाली उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याचे उत्तर दिले जात आहे .


पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरू झाला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निर्दोष लोकांचा बळी गेला होता. यानंतर भारताने सिंधु जल संधीला स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे पाणी भारताने रोखले होते. तसेच अनेक वेळ भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला उत्तर दिले जाईल अशी शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईसाठी लष्कराला फ्री हँड दिला होता.

Comments
Add Comment

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही