दिडशे माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या होणार शिवापुरात ‘रणस्तंभाचे’ उद्घाटन


कुडाळ : देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे "रणस्तंभ" उभारण्यात आला आहे. या रणस्तंभाचे उद्घाटन ८ मे रोजी सकाळी १० वाजता कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या या वीर पुत्रांना सलामी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर माजी सैनिक प्रतिनिधी बाबुराव कविटकर, शिवराम जोशी, विष्णू ताम्हणकर, शशिकांत गावडे, माजी सभापती मोहन सावंत, सरपंच सुनीता शेडगे, उपसरपंच महेंद्र राऊळ आधी प्रमुख मान्यवर उपस्थित
राहणार आहेत.



शिवापूर गावातील भारताच्या स्वातंत्र्य लढाईपासून आजपर्यंत शहीद झालेल्या दहा भारतीय सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. देशासाठी वीरमरण पत्करले. यामध्ये न्हानू बाबाजी घाडी हे आझाद हिंद सेनेतून शत्रूशी लढताना शहीद झाले. १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धात लक्ष्मण तात्या पेडणेकर, तर १९६२ च्या चीन युद्धात सिताराम भिसाजी रेंमुळकर, यांना वीरगती प्राप्त झाली. १९७२ साली लक्ष्मण नाना पालकर तर १९७३ साली शिवराम लक्ष्मण राऊळ यांना वीरगती प्राप्त झाली. १९७५ साली अंबाला टँक येथे दत्ताराम धाकू पेडणेकर, तर १९७९ साली लखनऊ येथे सुभाष दाजी शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली. १९९३ साली ऑपरेशन ऱ्हिनो नागालँड येथे सेनापदक प्राप्त लक्ष्मण सिताराम शेडगे यांना वीरगती प्राप्त झाली. १९९९ साली सुभाष लक्ष्मण पालकर यांना वीरगती प्राप्त झाली, तर २०१७ मध्ये जम्मू-काश्मीर येथे हरी गोपाळ पाटकर यांना वीरगती प्राप्त झाली होती. या सर्व शिवापूरच्या वीर पुत्रांचा सन्मान म्हणून रणस्तंभ उभारण्यात आलेला आहे. या रणस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहेत. यावेळी शिवापूर गावातील व पंचक्रोशीतील दीडशे माजी सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. तर शिवापूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन यावेळी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी