Operation Sindoor: पंतप्रधान मोदींनी केले भारतीय सैन्याचे कौतुक, म्हणाले "संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण"

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) बद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.



ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान


पहलगाम हल्ल्यात महिलांचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्वस्त करत, भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ल्यात मृत पावलेल्या २६ जणांना न्याय मिळवून दिला आहे. यासाठी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने फतेह मिळवला. भारताच्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला खरा, पण या हल्ल्याची बातमी मिळताच देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिले विधान केले आहे.


ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारताच्या तिन्ही सैन्यांचे अभिनंदन करताना त्यांनी सांगितले की "भारतीय सैन्याने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. आणि हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे."



पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील


या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि देशाच्या सद्य परिस्थितीची माहिती देतील अशी माहिती समोर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होतील.



कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब ठार


भारतीय सैन्याने काल रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. त्याच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा यात मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक

वॉटर मेट्रोसाठी प्रभावी काम; ३४० किमी वॉटर मेट्रोमार्गांचे जाळे उभारणार मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मुसळधार ! भंडारदरा निम्मे भरले तर मुळा नदीला पूर

Ahilyanagar : नगर जिल्ह्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा धरण निम्मे भरले आहे. भंडारदरा धरण

CM Devendra Fadnavis : फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

१ कोटी खोटारडे लोक मेले, तेव्हा हे पैदा झाल्याचा हल्लाबोल मुंबई : "देवेंद्र फडणवीसला हव्या तेवढ्या शिव्या द्या,

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मालमत्तांची तपासणी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

- राज्यव्यापी तपासणीचा तीन महिन्यांत अहवाल देणार मुंबई : इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे