‘प्रहार’ची वेबसाईट आता नव्या रंगात आणि ढंगात…!

आपल्या विश्वासाचा ‘प्रहार’ आता तुमच्यासमोर नव्या रूपात!


मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘प्रहार’ दैनिकाची अधिकृत वेबसाईट www.prahaar.in आता एकदम नव्या रंगसंगतीत, आकर्षक लेआऊटसह आणि अधिक वापरकर्ता-सुलभ पद्धतीने सादर केली आहे. वाचकांच्या अभिप्रायांवर आधारित अनेक नव्या सुविधा आणि सुधारणांसह ही वेबसाईट पुन्हा सजली आहे.


नवे डिझाईन अधिक स्पष्ट, नेटके आणि मोबाईल व संगणक दोन्हीवर सहज वाचता येईल असे आहे. बातम्यांचे विभाग आता अधिक सुबकपणे मांडले गेले आहेत, थेट लाईव्ह अपडेट्स, व्हिडिओ बातम्या, पॉडकास्ट, तसेच तुमच्या आवडीच्या बातम्यांचा विशेष संग्रह — हे सगळं आता एका क्लिकवर!



तुमचं मत आम्हाला मोलाचं आहे!


ही नवी वेबसाईट तुम्हाला कशी वाटली? अजून काय सुधारणा अपेक्षित आहेत? कोणते विभाग अधिक आकर्षक झालेत? हे सगळं आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा.


तुमच्या सूचना आम्ही नक्कीच विचारात घेऊ आणि प्रहारची वेबसाईट अजूनही तुमच्यासाठी अधिक उपयुक्त आणि प्रभावी बनवत राहू.


शब्दांना सत्याची धार असलेल्या दैनिक प्रहारचे संकेतस्थळ www.prahaar.in — मधील बातम्या... तुमच्या भाषेत, तुमच्या मते, तुमच्यासाठी!


यात आहे.. ब्रेकींग न्यूज, ताज्या घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, देश, विदेश, कला, क्रिडा, आयपीएल, Life style, अर्थविश्व, संपादकीय विशेष लेख, क्राईम, व्हिडिओ, मनोरंजन आणि साप्ताहिक पुरवण्यांची मेजवानी.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून