Food Poisoning : लग्न समारंभाला जाताय सावधान! जेवणातून ६०० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल ६०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. सध्या सर्व पीडितांवर खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नेमकं प्रकरण काय?


अंबाडा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये अंबाळासह महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर आणि इतर ३२ ठाकरवाड्यातील वऱ्हाडी आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर विवाहासाठी आलेल्या सर्व मंडळींनी जेवण केले. मात्र या जेवणातून अनेकांना उलटी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकामागोमाग एक जण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विषबाधा झाल्याचे समोर आले.


या विवाहसोहळ्यात अंबाला येथील ग्रामस्थांसह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह, ठाकुरवाडी, कन्नड तालुक्यासह निरगुडी पिंपरी तसेच नाशिक, जळगावमधील ३२ ठाकरवाड्यातील पाहुण्यांनी विविध गावातील जवळपास ६०० जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत सुरेश गुलाब मधे (८) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १७ लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


सध्या गंभीर प्रकृती असणाऱ्या पीडितांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही रुग्णांवर करंजखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र विषबाधा कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप समोर आले नाही.

Comments
Add Comment

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

जातीयवादामुळे विद्यार्थ्याच्या नोकरीवर गदा?

महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन पुणे  : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम