Food Poisoning : लग्न समारंभाला जाताय सावधान! जेवणातून ६०० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल ६०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. सध्या सर्व पीडितांवर खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नेमकं प्रकरण काय?


अंबाडा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये अंबाळासह महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर आणि इतर ३२ ठाकरवाड्यातील वऱ्हाडी आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर विवाहासाठी आलेल्या सर्व मंडळींनी जेवण केले. मात्र या जेवणातून अनेकांना उलटी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकामागोमाग एक जण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विषबाधा झाल्याचे समोर आले.


या विवाहसोहळ्यात अंबाला येथील ग्रामस्थांसह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह, ठाकुरवाडी, कन्नड तालुक्यासह निरगुडी पिंपरी तसेच नाशिक, जळगावमधील ३२ ठाकरवाड्यातील पाहुण्यांनी विविध गावातील जवळपास ६०० जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत सुरेश गुलाब मधे (८) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १७ लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


सध्या गंभीर प्रकृती असणाऱ्या पीडितांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही रुग्णांवर करंजखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र विषबाधा कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप समोर आले नाही.

Comments
Add Comment

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट