Pahalgam Terror Attack : पुन्हा एकदा दहशतीचा अंधार!

काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच आता रक्ताचं थरारक सावट… हो, आपण बोलतोय त्या नव्या अतिरेकी हल्ल्याबद्दल, ज्याने पुन्हा एकदा देशाच्या काळजावर घाव घातलाय... काय आहे हा नेमका प्रकार, चला जाणून घेऊ या...



पहलगामजवळच्या बैसरन… ज्याला "मिनी स्वित्झर्लंड" म्हणतात… तिथं पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते. पण अचानक दोन लष्करी गणवेशातील अतिरेकी आले… आणि सुरू झाला गोळ्यांचा पाऊस! धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा पडला. ३० पर्यटकांचा मृत्यू आणि १५ पेक्षा अधिक जखमी… त्यात परदेशी पर्यटकांचाही समावेश. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या डोंबिवली, पुणे आणि पनवेलमधलेही लोक होते. ते तिथं फिरायला गेले होते…


?si=5phCoby_Xr4BpyUc

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सौदी दौरा अर्धवट सोडून देशात परतावं लागलं. गृहमंत्री अमित शहा तातडीनं काश्मीरला रवाना झाले. देशभरातून संताप व्यक्त होतोय. पण प्रश्न असा आहे की, केवळ संताप पुरेसा आहे का? पर्यटन हे केवळ उद्योग नाही, तर लोकांच्या स्वप्नांचा भाग असतो. तिथं जाऊन लोक निसर्गाचा अनुभव घेतात, आयुष्य जगतात. आणि जर अशा ठिकाणी दहशतीची छाया आली… तर ती स्वप्नंही चिरडली जातात.



३७० कलम हटवल्यावर सरकारने अनेकदा सांगितलं, काश्मीर आता सुरक्षित आहे. पण जर अतिरेकी खुलेआम लष्करी वेशात येऊन हल्ला करू शकतात, तर सुरक्षा यंत्रणा कुठं कमी पडल्या? 'कश्मीर रेझिस्टन्स' नावाच्या पाक-समर्थित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. त्यांचा दावा आहे की, गैर-काश्मिरींना इथं स्थायिक होऊ द्यायचं नाही… म्हणून आम्ही हिंसा करू. त्यामुळं हा केवळ एका भागावरचा हल्ला नाही, हे देशाच्या एकतेवरचं आव्हान आहे!


अतिरेकी हल्ल्यांनंतर फक्त कोम्बिंग ऑपरेशन करून भागणार नाही. गरज आहे अचूक कारवाईची. गरज आहे स्थानिक जनतेचा विश्वास जपणारी धोरणं राबवण्याची. आणि गरज आहे दहशतीला कायमचा उखडून टाकण्याची! आज जिथं रक्त सांडलंय, तिथंच पुन्हा एकदा आनंदाची चाहूल यायला हवी. काश्मीरच्या निसर्गात आपल्याला शांततेचा उजेड हवा आहे… आणि तो फक्त शब्दांनी नाही, तर ठोस कृतीनेच शक्य आहे.

Comments
Add Comment

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत