Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

  75

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने या प्रकरणात पहिल्यांदाच सुरक्षेतील गाफीलपणाची कबुली दिली आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, एकही दहशतवादी वाचणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्राने मांडली आहे.


आज दिल्लीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. “या घटनेत सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली असून तिचे गांभीर्याने परीक्षण सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. बैठकीत उपस्थित सर्व पक्षांनी सरकारच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आश्वासन दिले.



गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर होती. पर्यटन, व्यवसाय आणि सामान्य जीवन सुरळीत सुरू होते. मात्र पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचा चेहरा समोर आला. बैठकीत अनेक नेत्यांनी ही परिस्थिती बदलण्याची गरज अधोरेखित केली.


हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यात सर्वात ठळक म्हणजे चिनाब नदीचे पाणी थांबवणे. भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला असून, त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.


दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारनेही तत्काळ आपत्कालीन बैठक घेतली. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी

पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे

Indus Water Treaty: पाकिस्तानची भारताला पाणी देण्याची विनंती; चार वेळा पाठवले पत्र

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताला चार वेळा पत्र लिहून सिंधू पाणी करार (IWT) स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली