Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने या प्रकरणात पहिल्यांदाच सुरक्षेतील गाफीलपणाची कबुली दिली आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, एकही दहशतवादी वाचणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्राने मांडली आहे.


आज दिल्लीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. “या घटनेत सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली असून तिचे गांभीर्याने परीक्षण सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. बैठकीत उपस्थित सर्व पक्षांनी सरकारच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आश्वासन दिले.



गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर होती. पर्यटन, व्यवसाय आणि सामान्य जीवन सुरळीत सुरू होते. मात्र पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचा चेहरा समोर आला. बैठकीत अनेक नेत्यांनी ही परिस्थिती बदलण्याची गरज अधोरेखित केली.


हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यात सर्वात ठळक म्हणजे चिनाब नदीचे पाणी थांबवणे. भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला असून, त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.


दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारनेही तत्काळ आपत्कालीन बैठक घेतली. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या