Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने या प्रकरणात पहिल्यांदाच सुरक्षेतील गाफीलपणाची कबुली दिली आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, एकही दहशतवादी वाचणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्राने मांडली आहे.


आज दिल्लीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. “या घटनेत सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली असून तिचे गांभीर्याने परीक्षण सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. बैठकीत उपस्थित सर्व पक्षांनी सरकारच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आश्वासन दिले.



गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर होती. पर्यटन, व्यवसाय आणि सामान्य जीवन सुरळीत सुरू होते. मात्र पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचा चेहरा समोर आला. बैठकीत अनेक नेत्यांनी ही परिस्थिती बदलण्याची गरज अधोरेखित केली.


हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यात सर्वात ठळक म्हणजे चिनाब नदीचे पाणी थांबवणे. भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला असून, त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.


दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारनेही तत्काळ आपत्कालीन बैठक घेतली. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची