भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार केले. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानभोवतीचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात डिप्लोमॅटिक स्ट्राईक अर्थात राजनैतिक हल्ल्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाली आहे.



भारताने अमेरिका, रशिया यांच्यासह वीस देशांच्या राजदूतांना बोलावून त्यांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. याआधी भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. अटारी सीमेवरुन भारत - पाकिस्तान दरम्यानचे येणे - जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना अती दक्षतेचा इशारा दिला आहे. या पाठोपाठ केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.लवकरच पाकिस्तानशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट भारतात ब्लॉक होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी जुलै २०२२, ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२३ मर्यादीत काळासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले होते.



मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी असे एकूण २६ पर्यटक ठार झाले होते. अनेक पर्यटक जखमी झाले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनीच केल्याचे ठोस पुरावे भारताच्या हाती आले आहेत. यानंतर भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करायला सुरुवात केली आहे.



भारताने गुरुवारी अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतार, जपान, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स आदी देशांच्या राजदूतांना साउथ ब्लॉक येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याची माहिती जी-२० देशांच्या राजदूतांना दिली. राजदूतांसोबतची परराष्ट्र मंत्रालयाची बैठक सुमारे ३० मिनिटे सुरू होती. या बैठकीआधी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानची कोंडी करण्याचा निर्णय झाला.

भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. अटारी सीमेवरुन भारत - पाकिस्तान दरम्यानचे येणे - जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता तर पाकिस्तानमधून वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्यांनाही २९ एप्रिल २०२५ पर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना

Twisha Sharma Case : ७ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई! सासू गिरिबाला सिंह अटकेत; सीबीआयचा तपास वेगात

ट्विशा शर्मा मृत्यू  (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय