नवी मुंबईत बसमध्ये लैंगिक संबंध! कंडक्टरवर कारवाई, पण पोलीस अजून गप्प का?

  231

प्रेमाच्या वेडात शहाणपण हरपलं… एनएमएमटीच्या बसमध्ये तरुण जोडप्याने काय केले वाचा...

नवी मुंबई : परदेशात नव्हे तर चक्क आपल्या नवी मुंबईत अशी घटना घडली आहे की, विचार करूनही डोळे विस्फारले जातात. प्रेम करायचं, हे कोणालाही नाकारता येणार नाही… पण जेव्हा हेच प्रेम बेशरमपणाच्या सीमारेषा ओलांडते, तेव्हा समाज काय म्हणतो? आणि प्रशासन काय करतो? असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला आहे.



नेमकी घटना काय घडली?


रविवारी सायंकाळी, नवीन मुंबई महानगरपालिकेच्या वातानुकूलित (AC) बसमध्ये एक तरुण जोडपं मागच्या बाकांवर ‘अति’ जवळीक करताना आढळलं. ती बस पनवेलहून कल्याणकडे निघाली होती. जास्त प्रवासी नव्हते. ट्रॅफिकमुळे बस थोडी मंदावली आणि बाहेरून एका दुचाकीस्वाराने त्या जोडप्याचा २२ सेकंदांचा व्हिडीओ शूट केला.


त्या व्हिडीओमध्ये दोघंही स्पष्टपणे एकमेकांमध्ये नको त्या अवस्थेत गुंतलेले दिसतात, अगदी सार्वजनिक ठिकाणी होणं अपेक्षित नसलेली कृती करताना. त्यांनी हा व्हिडीओ पुढे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला.



प्रशासन काय म्हणतं?


नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस कंडक्टरवर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. कंडक्टर पुरेसा सतर्क का नव्हता? त्याने तात्काळ हस्तक्षेप का केला नाही? याचे स्पष्टीकरण लेखी स्वरूपात मागवण्यात आले आहे. तर महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांचे यावर कोणतेही वक्तव्य मिळालेले नाही.



कायदा काय सांगतो?


भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ नुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हा शिक्षेस पात्र गुन्हा मानला जातो. तीन महिन्यांपर्यंतची जेल किंवा १,००० रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.


दरम्यान, आतापर्यंत महापालिकेने पोलिसांकडे तक्रार दिलीच नाही. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की,




  • अशा घटनांना जर वेळीच आवर घातला नाही, तर त्याचं समाजावर काय परिणाम होईल?

  • कंडक्टरवर कारवाई केली जातेय, पण अश्लील वर्तन करणाऱ्या जोडप्यावर काहीच नाही?

  • कायदा सर्वांसाठी समान आहे का, की फक्त नजरेस पडलेल्यांवरच तो लागू होतो?


ही घटना केवळ एक चुकीचं वर्तन नाही. ती समाजाच्या सार्वजनिक शिस्तीवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कंडक्टरवर कारवाई करून जबाबदारी ढकलणे सोपे आहे. पण मुख्य दोषींवरही तितकेच कठोर पाऊल उचलले जाणार का?


ही घटना केवळ नवी मुंबईची नाही, ती आपल्या सार्वजनिक वर्तनाच्या मर्यादा पुन्हा ठरवण्याची गरज अधोरेखित करते. मुंबईतही वेगवेगळ्या समुद्र किनारी आणि गार्डन परिसरात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे, याचीही नीट तपासणी होणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.