Sunscreen Lotion : सनस्क्रीन लोशन लावायचंय.. पण ते निवडायचं कसं?

मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच बाहेर पडावं लागतंय. अशा वेळी त्वचेच्या मदतीला येतं ते सनस्क्रीन लोशन. पण, ते कसं निवडायचं, याविषयी आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.



सनस्क्रीन निवडताना सगळ्यात आधी SPF किती आहे, ते पाहायचं. सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी SPF 30 पेक्षा जास्त असणारं सनस्क्रीन निवडा. शक्यतो, SPF 50 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम. यासोबत तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकाराला लक्षात घेऊन सनस्क्रीनची निवड करा. म्हणजे, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी तेलाचा अंश कमी असणारं सनस्क्रीन निवडावं, तर संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी पॅराबीन फ्री लोशन निवडावं.



चेहरा, कान, गळा, मान, हात, पाय अशा सूर्याच्या थेट संपर्कात येणाऱ्या अवयवांवर सनस्क्रीन लावा. बाहेर निघण्यापूर्वी १५ ते २० मिनीटं आधी सनस्क्रीन लावणं उत्तम ठरेल. कारण, २० मिनिटांनंतर ते काम सुरू करतं. तसंच, जर खूप घाम येत असेल तर दर दोन ते तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावायला विसरू नका.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०