JEE Mains Result 2025 : जेईई मेन्स सत्र २ चा निकाल जाहीर

  47

मुंबई : जेईई मेन्स सत्र -२च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. काल (दि १८) जेईई मेन्स सत्र -२ची उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आज जेईई मेन्स सत्र -२च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात २४ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.



जेईई मेन्स सत्र -२ ची परीक्षा २ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान पार पडली. या परीक्षेनंतर १७ एप्रिलला त्यांची उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ही उत्तरं काढून टाकण्यात आली. त्यानंतर काल (दि १८) पुन्हा उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. आणि आज (दि १९) सकाळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स सत्र -२चा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स २०२५ च्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी एकूण दहा लाख ६१ हजार ८४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी नऊ लाख ९२ हजार ३५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील २४ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळवले आहेत. पैकीच्या पकी गुण मिळवणाऱ्या २४ जणांमध्ये २ मुलींचाही समावेश आहे. या मुली जानेवारी महिन्यात झालेल्या जेईई मेन्स सत्र-१ च्या निकालातही अव्वल होत्या. निकाल घोषित झाल्यावर NTA टॉपर्सच्या यादीसह कॅटॅगरीनुसार कट-ऑफ आणि अखिल भारतीय रँकही (AIR ) जाहीर होणार आहे.



असा चेक करा रिझल्ट


सर्वप्रथम jeemain.nta.ac.in या NTA JEE च्या अधिकृत वेबसाइट वर जा.


येथे तुम्हाला होम पेजवर JEE मेन्स निकाल २०२५ ची लिंक दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.


त्यानंतर लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.


तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.


ते डाउनलोड करून ठेवा, भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना