Best Bus : 'बेस्ट' बस का पडतेय आजारी ?

मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत नोकरी ,व्यवसाय, शिक्षण तसेच वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने हजारो नागरिक दररोज बसने प्रवास करतात. रेल्वे एकाच वेळी काही हजार लोकांना घेऊन प्रवास करत असते. त्या तुलनेत बेस्टच्या बस एकावेळी साधारण ५० ते १०० जणांना घेऊनच प्रवास करू शकतात. रेल्वे फक्त रुळांवरच धावते. तर बेस्टच्या बस मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. यामुळे बसने अनेकजण प्रवास करतात. पण एवढी महत्त्वाची असलेली ही बेस्ट उपक्रमाची बस सेवा मागील काही वर्षांपासून आजारी आहे.


बेस्ट उपक्रमाच्या बसचा कधी अपघात होतो तर कधी आगीत 'बेस्ट बसचा जीव गुदरमतो. याचं कारण म्हणजे योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती न करणे; असे वाहतूक तज्ज्ञ सांगतात.



बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढत आहे. ताफ्यातील एकूण बसच्या तुलनेत सुमारे ७३ टक्के बसगाड्या कंत्राटदारांच्या आहेत. परंतु, यापैकी बहुसंख्य बसगाड्या नादुरूस्त असून, योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्या सतत बिघडत आहेत. त्याचबरोबर अधूनमधून या बसगाड्यांना आग लागत आहे. यामुळे कंत्राटदारांच्या बसगाड्या बेस्टसाठी तापदायक ठरू लागल्या आहेत.बेस्ट उपक्रमात २०१९ पासून भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसगाड्यांबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या. तसेच मागील काही कालावधीपासून बसगाडीला आग लागणे, बस रस्त्यात बंद पडणे, विद्युत बॅटरी पेट घेणे अशा घटना घडत आहेत. सुदैवाने आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरी वारंवार घडणारे हे प्रकार बंद होण्यासाठी योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचं आहे; असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Mayor's Residence : महापौरांच्या निवासस्थानाचे होणार नुतनीकरण

- रितू तावडे यांचा गृहप्रवेश लांबणीवर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) मुंबई महापौर पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रितू

BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनणार कार्यकारी अभियंता

- स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील कार्यकारी

Breaking News : “मराठी सक्तीला तात्पुरता ब्रेक?”; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी निर्णय ऑगस्टपर्यंत स्थगित असल्याचा शशांक राव यांचा दावा

- सरकारचा अंतिम निर्णय मात्र प्रतीक्षेत मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ