हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध


मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. नविन शिक्षण धोरणाचा अवलंब करीत राज्य शासनाने शिक्षण आराखड्याचा स्वीकार केला असून त्रिभाषा सूत्र लागू करत हिंदी विषय राज्यात सक्तीचा केलेला आहे. हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शुक्रवारी हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून निषेध करण्याचा प्रयत्न केला.


यावेळी घाटकोपर पोलिसांनी हे आंदोलन वेळीच रोखून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केले. मनविसेचे घाटकोपर सचिव अभिषेक सावंत यांनी कार्यकर्त्यांसह हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके हातात घेत घोषणा बाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेतील पाठ्यपुस्तके जाळून निषेध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.



त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रखर विरोध दर्शवला आहे. राज्य सरकार हिंदीची सक्ती करून मराठी भाषा संपवण्याचा डाव साधत आहे. आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत असताना पोलीस आमचे आंदोलन दडपत असल्याचे मनविसेचे सचिव अभिषेक सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील