मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे बांधकाम जुने झाले असून तब्बल ४१ वर्षे जुने असलेल्या या जलाशयाच्या दुरुस्तीचे काम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामांसाठी विविध करांसह तब्बल ०८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे याच जलाशयाची आवार भिंत कोसळून मोठी दुघर्टना घडल्यानंतर येथील आवार भिंतीसह विविध प्रकारची कामे करण्यात आली होती. त्यानंतर आता या जलाशयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेकडून मालाड परिसरातील विविध भागांना मालाड जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मालाड टेकडीवरील हा जलाशय-२ हा सन १९८४ मध्ये बांधण्यात आला होता. याची पाणीसाठा करण्याची क्षमता सुमारे १८.१४ दशलक्ष लिटर आहे. हा जलाशय ४० वर्षांपेक्षा अधिक जुना झाल्यामुळे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागारांच्या सूचनेनुसार जल अभियांत्रिकी विभागामार्फत जलाशय तसेच त्यासंबंधित नियंत्रण कक्ष क्रमांक १ व २ यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या तपासणीच्या अहवालानुसार जलाशय आणि नियंत्रण कक्षांची तातडीने व्यापक संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे पाणी पुरवठा प्रकल्प खात्यामार्फत याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सल्लागाराच्या सूचेनेनुसार निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये देव इंजिनिअरींग ही कंपनी पात्र ठरली आहे. या कामांसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलाशय व नियंत्रण कक्षांच्या दुरुस्तीमुळे मालाड परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत राहण्यास मदत होईल असे महापालिका पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून हे काम पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य