Tamil Nadu Temple : मंदिरांना दान केलेलं सोनं वितळवून राज्य सरकार कमवतंय कोट्यवधी रुपये

तामिळनाडू : तामिळनाडूमधील मंदिरांना आता उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळाला आहे. मंदिरांना दान केलेलं सोनं तामिळनाडू सरकार वितळवून त्याच्या सोन्याच्या पट्ट्या करुन घेत आहे. या पद्धतीने तामिळनाडू सरकारने आतापर्यंत २१ मंदिरांमधील सुमारे एक हजार ७४ किलो सोनं वितळवून २४ कॅरेट सोन्याच्या पट्ट्या (गोल्ड बार) तयार करुन घेतल्या आहेत. हे सोनं भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेत जमा केले जात आहे.



सोन्याच्या पट्ट्यांवर स्टेट बँकेकडून आतापर्यंत १८ कोटी रुपये व्याज देण्यात आले आहे. या पैशांचा वापर मंदिरांच्या माध्यमातून सामाजिक कार्य, विकासाची कामं आणि मंदिरांची देखभाल यांसाठी केला जात असल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. मुंबईतील टांकसाळीत सोनं वितळवून त्याच्या पट्ट्या तयार करण्याचे काम करण्यात आले. या पट्ट्या एका योजनेअंतर्गत (गोल्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम) स्टेट बँकेत जमा करण्यात आल्या आहेत; अशी माहिती तामिळनाडू सरकारने दिली.



पट्ट्या तयार करण्यासाठी दान स्वरुपात मंदिरांना मिळालेल्या सोन्याचाच वापर केला आहे. हे सोनं वितळवण्याआधी ते मंदिरात वापरले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली आहे. जे सोने वापरात नव्हते तेच वितळवण्यात आल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. या कामासाठी सर्वात मोठे योगदान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील अरुलमिघू मरीअम्मन मंदिराचे होते. एकट्या मरियम्मन मंदिराने सुमारे ४२४ किलो सोने वितळवण्यासाठी दिले.



वितळवन्यासाठी मंदिराच्या सोन्याची निवड करणे आणि नंतर पट्ट्या तयार झाल्यावर त्या बँकेत जमा करणे ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याची माहिती तामिळनाडू सरकारने विधानसभेत दिली. या कामासाठी राज्य सरकारने तीन प्रादेशिक समित्या स्थापन केल्या आहेत. यातील प्रत्येक समितीचे अध्यक्ष हे निवृत्त न्यायाधीश आहेत.



सोन्याच्या योजनेला यश मिळत असल्याचे बघून तामिळनाडू सरकारने राज्यातील मंदिरांकडे दान म्हणून आलेली चांदी आणि चांदीचे दागिने हे वितळवण्याची योजना तयार करायला सुरुवात केली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे संकलन आणि ती वितळवण्याचे काम निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीतील समित्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले जाणार आहे.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या