Tamil Nadu Temple : मंदिरांना दान केलेलं सोनं वितळवून राज्य सरकार कमवतंय कोट्यवधी रुपये

तामिळनाडू : तामिळनाडूमधील मंदिरांना आता उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळाला आहे. मंदिरांना दान केलेलं सोनं तामिळनाडू सरकार वितळवून त्याच्या सोन्याच्या पट्ट्या करुन घेत आहे. या पद्धतीने तामिळनाडू सरकारने आतापर्यंत २१ मंदिरांमधील सुमारे एक हजार ७४ किलो सोनं वितळवून २४ कॅरेट सोन्याच्या पट्ट्या (गोल्ड बार) तयार करुन घेतल्या आहेत. हे सोनं भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेत जमा केले जात आहे.



सोन्याच्या पट्ट्यांवर स्टेट बँकेकडून आतापर्यंत १८ कोटी रुपये व्याज देण्यात आले आहे. या पैशांचा वापर मंदिरांच्या माध्यमातून सामाजिक कार्य, विकासाची कामं आणि मंदिरांची देखभाल यांसाठी केला जात असल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. मुंबईतील टांकसाळीत सोनं वितळवून त्याच्या पट्ट्या तयार करण्याचे काम करण्यात आले. या पट्ट्या एका योजनेअंतर्गत (गोल्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम) स्टेट बँकेत जमा करण्यात आल्या आहेत; अशी माहिती तामिळनाडू सरकारने दिली.



पट्ट्या तयार करण्यासाठी दान स्वरुपात मंदिरांना मिळालेल्या सोन्याचाच वापर केला आहे. हे सोनं वितळवण्याआधी ते मंदिरात वापरले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली आहे. जे सोने वापरात नव्हते तेच वितळवण्यात आल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. या कामासाठी सर्वात मोठे योगदान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील अरुलमिघू मरीअम्मन मंदिराचे होते. एकट्या मरियम्मन मंदिराने सुमारे ४२४ किलो सोने वितळवण्यासाठी दिले.



वितळवन्यासाठी मंदिराच्या सोन्याची निवड करणे आणि नंतर पट्ट्या तयार झाल्यावर त्या बँकेत जमा करणे ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याची माहिती तामिळनाडू सरकारने विधानसभेत दिली. या कामासाठी राज्य सरकारने तीन प्रादेशिक समित्या स्थापन केल्या आहेत. यातील प्रत्येक समितीचे अध्यक्ष हे निवृत्त न्यायाधीश आहेत.



सोन्याच्या योजनेला यश मिळत असल्याचे बघून तामिळनाडू सरकारने राज्यातील मंदिरांकडे दान म्हणून आलेली चांदी आणि चांदीचे दागिने हे वितळवण्याची योजना तयार करायला सुरुवात केली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे संकलन आणि ती वितळवण्याचे काम निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीतील समित्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या