Amravati : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू, आता मुंबई ते अमरावती फक्त दोन तास

  81

अमरावती : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली आहे. पहिले प्रवासी विमान म्हणून अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. हे विमान अमरावती विमानतळावर उतरले. अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानावर जलतोरण उभारण्यात आले. विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली.



आता मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतुकीमुळे अमरावतीसह विदर्भाच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाली आहे; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याआधी अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 या विमानातून मुंबई - अमरावती असा प्रवास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच मान्यवर यांचे अमरावती विमानतळावर आगमन झाले.



अमरावती विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी थोडा वेळ बातचीत केली. यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक छोटा व्हिडीओ केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. नवनीत राणा यांनी इतर प्रवाशांसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. विमान वाहतुकीमुळे विकासाला चालना मिळेल, असे त्या म्हणाल्या.



मुंबई ते अमरावती फक्त दोन तास

विमानामुळे मुंबई ते अमरावती हा प्रवास फक्त दोन तासांत होणार आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास सहा तासांवर आला आहे. लवकरच अमरावती येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र पण सुरू होत आहे. यामुळे अमरावतीतून देशाला नवे वैमानिक आणि प्रशिक्षक मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

असे आहे अमरावती विमानतळ

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १८५० मीटर असून रुंदी ४५ मीटर इतकी आहे.

आशियातील सर्वात मोठे एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावती विमानतळावर उभारले जाणार आहे.

अमरावती विमानतळावर एकाच वेळी एटीआर/७२ सीटर अशी दोन विमाने उभी केली (पार्क) जाऊ शकतात.

ऑक्टोबर २०२५ मध्ये अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार आहे.

अमरावती विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.
Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती