Amravati : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू, आता मुंबई ते अमरावती फक्त दोन तास

  104

अमरावती : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली आहे. पहिले प्रवासी विमान म्हणून अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. हे विमान अमरावती विमानतळावर उतरले. अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानावर जलतोरण उभारण्यात आले. विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली.



आता मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतुकीमुळे अमरावतीसह विदर्भाच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाली आहे; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याआधी अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 या विमानातून मुंबई - अमरावती असा प्रवास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच मान्यवर यांचे अमरावती विमानतळावर आगमन झाले.



अमरावती विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी थोडा वेळ बातचीत केली. यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक छोटा व्हिडीओ केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. नवनीत राणा यांनी इतर प्रवाशांसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. विमान वाहतुकीमुळे विकासाला चालना मिळेल, असे त्या म्हणाल्या.



मुंबई ते अमरावती फक्त दोन तास

विमानामुळे मुंबई ते अमरावती हा प्रवास फक्त दोन तासांत होणार आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास सहा तासांवर आला आहे. लवकरच अमरावती येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र पण सुरू होत आहे. यामुळे अमरावतीतून देशाला नवे वैमानिक आणि प्रशिक्षक मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

असे आहे अमरावती विमानतळ

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १८५० मीटर असून रुंदी ४५ मीटर इतकी आहे.

आशियातील सर्वात मोठे एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावती विमानतळावर उभारले जाणार आहे.

अमरावती विमानतळावर एकाच वेळी एटीआर/७२ सीटर अशी दोन विमाने उभी केली (पार्क) जाऊ शकतात.

ऑक्टोबर २०२५ मध्ये अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार आहे.

अमरावती विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत