Mumbai Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार कोंडीमुक्त! ३६ रेल्वे स्थानकांचे होणार नूतनीकरण

  134

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. मुंबईत लोकलप्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे दररोज होणारी लोकल गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कार्यरत असते. अशातच लवकरच मुंबईकरांचा प्रवास कोंडीमुक्त आणि आरामदायी होणार आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांचे (Railway Station) नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना येत्या काळात चांगल्या प्रवास सुविधांचा अनुभव घेता येणार आहे. (Mumbai News)



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील परळ, माटुंगा, शहाड, घाटकोपर यासह इतर ३६ स्थानकांचे नूतनीकरण केले त आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १,८१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानके अधिक सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी डिझाईन केलेल्या वैशिष्ट्यांची मालिका सादर करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश केवळ स्थानकांचे सौंदर्यीकरण करणे नसून प्रवाशांचा प्रवास अनुभवात लक्षणीय सुधारणा करणे आहे.


यामध्ये सुविधा आणि जागेचा विस्तार करून, नूतनीकरणामुळे गर्दीची परिस्थिती कमी होईल असे आश्वासन मंत्रालयातर्फे देण्यात आले आहे. आधुनिक साइनबोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एन्ट्री आणि एक्झिटसाठी सुधारणा करणे, अपंग प्रवाशांसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या जागांची ओळख करून देणे या कामांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना आणि पाणीबचत कामांचा समावेश असणार आहे.


दरम्यान, मध्य रेल्वेने (Central Railway) सांगितल्यानुसार, ३६ स्थानकांपैकी पाच स्थानकांवर ४० टक्के काम आधीच पूर्ण झाले आहे. तर नजीकच्या काळात या स्थानकांची कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पश्चिम मार्गावर पाच स्थानकांवर २५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मरिन लाईन्स आणि जोगेश्वरी या स्थानकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही