Mumbai Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार कोंडीमुक्त! ३६ रेल्वे स्थानकांचे होणार नूतनीकरण

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. मुंबईत लोकलप्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे दररोज होणारी लोकल गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कार्यरत असते. अशातच लवकरच मुंबईकरांचा प्रवास कोंडीमुक्त आणि आरामदायी होणार आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांचे (Railway Station) नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना येत्या काळात चांगल्या प्रवास सुविधांचा अनुभव घेता येणार आहे. (Mumbai News)



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील परळ, माटुंगा, शहाड, घाटकोपर यासह इतर ३६ स्थानकांचे नूतनीकरण केले त आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १,८१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानके अधिक सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी डिझाईन केलेल्या वैशिष्ट्यांची मालिका सादर करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश केवळ स्थानकांचे सौंदर्यीकरण करणे नसून प्रवाशांचा प्रवास अनुभवात लक्षणीय सुधारणा करणे आहे.


यामध्ये सुविधा आणि जागेचा विस्तार करून, नूतनीकरणामुळे गर्दीची परिस्थिती कमी होईल असे आश्वासन मंत्रालयातर्फे देण्यात आले आहे. आधुनिक साइनबोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एन्ट्री आणि एक्झिटसाठी सुधारणा करणे, अपंग प्रवाशांसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या जागांची ओळख करून देणे या कामांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना आणि पाणीबचत कामांचा समावेश असणार आहे.


दरम्यान, मध्य रेल्वेने (Central Railway) सांगितल्यानुसार, ३६ स्थानकांपैकी पाच स्थानकांवर ४० टक्के काम आधीच पूर्ण झाले आहे. तर नजीकच्या काळात या स्थानकांची कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पश्चिम मार्गावर पाच स्थानकांवर २५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मरिन लाईन्स आणि जोगेश्वरी या स्थानकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता