Buldhana Water Shortage : बुलढाण्यात पाणीबाणी! दोन आठवड्यानंतर होतोय पाणीपुरवठा

पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता


बुलढाणा : गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा (Summer heat) चांगलाच वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून उन्हाच्या झळांचा (Heat Wave) नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. मात्र अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट आले आहे. बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलसंकट अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. (Water Shortage)



मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात ५०० हून अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यात सर्वात जास्त गावांना पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे.



राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक


महाराष्ट्रासमोर पाणीसंकट (Water crisis) उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.



उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता 


पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात (Ujani Dam) सध्या तीन टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. (Water Shortage)


तवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६६ पूर्णांक ६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.

Comments
Add Comment

Udya Samant : शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरांमध्ये ‘मराठी भाषा विकास केंद्र

आगामी एका महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भाषा अधिकारी - मंत्री उदय सामंत मुंबई: हिंदूहृदयसम्राट

Royalty Free for Farmers : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, बैलगाड्या अडवल्यास आता पोलिसांवरच कारवाई

- शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द; विहीर, गोठ्यासाठी गौण खनिज मोफत मुंबई : बळीराजाला स्वतःच्या शेती

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक! केतनला ढकलण्यासाठी सियाने केला होता सराव; पोलिसांच्या हाती लागले सर्वात मोठे पुरावे!

सिया गोयलच्या घरी पोलिसांचा पंचनामा, घटनेतील कपडे जप्त पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case)

Dr. Pankaj Bhoyar : खाजगी, सीबीएसई शाळांच्या मनमानीला बसणार चाप

मुजोर शाळांवर कडक कारवाई करण्यासाठी 'नोडल ऑफिसर्स'ची नियुक्ती - मंत्री डॉ. पंकज भोयर मुंबई : खाजगी, सीबीएसई आणि

Government Scheme : अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार

१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर मुंबई : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर आक्षेपार्ह पोस्ट; महिला डॉक्टर ५ वर्षांसाठी निलंबित

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी