नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार


मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. केवळ गुन्हा केल्यावरच कारवाई न करता, आता या नागरिकांचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासणीची मोहीम राबवण्यात येईल. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, अशांना थेट डिटेंशन सेंटरमध्ये पाठवून हद्दपार करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील बेकायदा नायजेरियन आणि बांग्लादेशी नागरिकांच्या प्रश्नावर आमदार स्नेहा दुबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत आमदार नाना पटोले आणि हेमंत ओगले यांनीही सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "अनेक नायजेरियन नागरिक शिक्षण किंवा वैद्यकीय कारणासाठी व्हिसा घेऊन येतात. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते बेकायदा वास्तव्य करतात. हद्दपारी टाळण्यासाठी हे लोक जाणीवपूर्वक स्वतःवर एखादा गुन्हा नोंदवून घेतात, जेणेकरून खटला सुरू असेपर्यंत त्यांना भारतात राहता येईल. ही 'मोडस ऑपरेंडी' ओळखून पोलिसांनी आतापर्यंत ६८ नायजेरियन नागरिकांना हद्दपार केले असून, १२२ जण सध्या अटक केंद्रात आहेत."



घरमालकांवरही कारवाईचा बडगा


अवैध नागरिकांना आश्रय देणाऱ्यांविरोधातही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. वैध पासपोर्ट किंवा व्हिसा तपासल्याशिवाय कोणालाही राहण्यासाठी जागा देऊ नये, असे आदेश देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन करून जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



नेमकी कारवाई काय करणार?


परदेशी नागरिक देशात आल्यानंतर त्यांच्या व्हिसाच्या मुदतीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभाग एक स्वतंत्र यंत्रणा (ट्रॅकिंग सिस्टीम) कार्यान्वित करणार आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असलेल्या विदेशी नागरिकांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात येईल, तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना तडीपारही केले जाईल. उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पबच्या नियमावलीत सुधारणा करण्यात येत असून, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर