BMC : टँकर मालकांचा संप मागे, विहिरी आणि कुपनलिका आता महापालिका घेणार नाही ताब्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील टँकरचालकांचा संप पाहता, व्यापक जनहित लक्षात घेता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. याअनुषंगाने, आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची १४ एप्रिल २०२५ भेट घेतली. या बैठकीत दोन्ही बाजुंनी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर काही वेळाने टँकरचालकांनी संप मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यामुळे मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याची महानगरपालिका प्रशासनाला आवश्यकता भासणार नाही.





या बैठकीला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्यासह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सचिव राजेश ठाकूर, उपाध्यक्ष हरबंस सिंग, जीतू शाह, खजिनदार अमोल मांढरे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य हजर होते. टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. संघटनेच्या मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात. केंद्रीय भूजल प्राधिकरण यांचेकडे वेळोवेळी बाजू मांडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सहाय्य मिळावे, अशी संघटनेने विनंती केली. तसेच मागण्यांचे सविस्तर निवेदन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केले.



टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिसांना १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, नियम न पाळल्यास विहीर व कूपनलिका धारकांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा परत घेण्याचे ठरले. मात्र ज्या धारकांनी मान्यताच घेतलेली नाही त्याना मान्यता घ्यावी लागेल हे स्पष्ट करण्यात आले. तसेच केंद्र शासनाशी निगडित मागण्या व बाबी संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने संघटनेला प्रशासकीय सहाय्य पुरवले जाईल. मात्र तांत्रिक बाबी या शासनाच्या स्तरावरील असून त्यामध्ये महानगरपालिका प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्यमंत्री यांनी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे टँकर चालक संघटनेने देखील सारासार विचार करून आपली भूमिका ठरवावी, असे गगराणी यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या सविस्तर व सकारात्मक चर्चेनंतर, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही तासांचा अवधी मागून घेतला आणि संघटनेची बैठक घेवून त्याआधारे भूमिका जाहीर करण्यात येईल, ही भूमिका सकारात्मक असेल, असे सांगितले होते. त्यानंतर, असोसिएशनने संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.
Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील