Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आली आहे. तसेच सलमानच्या घुसून त्याला बॉम्बने उडवू असंही त्यात म्हटलंय. धमकी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक आहे. या नंबरवर कोणीही तक्रार करू शकते. अनेकदा या नंबरवर स्वतःची ओळख लपवून तक्रारी पाठवल्या जातात. पोलीस सर्व तक्रारींची दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करतात. यामुळे सलमानला धमकी देणारा संदेश व्हॉट्सॲपवर येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सलमानला संरक्षण पुरवणाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणापासूनच तो बिष्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. काळवीट हा बिष्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय बुलेटप्रूफ कार खरेदी केली आणि वापरायला सुरुवात केली.
Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता