Jejuri Khandoba Temple : जेजुरीच्या खंडोबा मंदिर आणि गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचे खंडोबा मंदिर व गड कोटाला पुरातत्त्व खात्याने राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित केला आहे. याबाबतचे पत्र श्री मार्तंड देवस्थानाला पाठविण्यात आले आहे.



राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून, यासाठी ३४९ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.त्यांपैकी सुमारे १०९ कोटी रुपयांची विकासकामे पहिल्या टप्प्यात सुरू आहेत. जेजुरीचे खंडोबा मंदिर व गडकोट हे राज्य संरक्षित स्मारक यापूर्वीच घोषित करण्यात आले असून, याबाबतचे पत्र पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने यांनी दिले आहे. त्यामुळे आता खंडोबा गडावर विकासकामे करण्यासाठी शासनाची अधिक मदत होणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.विश्वस्त मंडळाने ही माहिती पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, नित्य सेवेकरी, पुजारी सेवेकरी आणि ग्रामस्थांना दिली. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, अनिल सौंडदे, ॲड. विश्वास पानसे, माजी विश्वस्त नितीन राऊत, संदीप जगताप, व्यवस्थापक आशिष बाठे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, बापू सातभाई, माधव बारभाई, सचिन मोरे, भाग्येश बारभाई आदी उपस्थित होते.


श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गड हा प्राचीन असून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभरात खंडोबा देवाच्या सात ते आठ मोठ्या यात्रा भरतात. या वेळी लाखो भाविक यात्रेसाठी येतात, तर दररोज कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी असते. वर्षभरात सुमारे ५० लाखांंहून अधिक भाविक देवधर्म करण्यासाठी व पर्यटनासाठी येतात.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट