छगन भुजबळ नाराज; म्हणाले, मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा!

पुणे : महात्मा फुले वाड्याच्या कामासाठी मला उपोषण करावं लागेल, कारण मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे, असे विधान करत अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज आपल्या नाराजीचा स्पष्ट सूर लावला. पुण्यात फुलेवाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भुजबळांनी यावेळी मंत्रिमंडळात डावलल्याबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.


विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना स्थान न मिळाल्याने त्यांचं नाराज असणं, यावर अनेक तर्क-वितर्क सुरू होते. मात्र आज त्यांच्या थेट वक्तव्यामुळे ही नाराजी उघड झाली आहे.



महात्मा फुले वाड्याच्या रखडलेल्या कामावर बोलताना भुजबळ म्हणाले, "या ऐतिहासिक वाड्याचे काम १०० ते २०० कोटींचे आहे. अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असलो तरी काहीही प्रगती झालेली नाही." तसेच, "ही जागा देशाला अर्पण झाली आहे. येथे येणाऱ्या लोकांसाठी सुविधा नाहीत. सभा घेण्यासाठीही जागा नाही. तरीही अधिकाऱ्यांकडून फक्त टोलवाटोलवी होत आहे," असे ताशेरे ओढत त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला.


"मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असले तरी पालिका अधिकारी जमिनीच्या अधिग्रहणाबाबत निष्क्रिय आहेत. जागा ताब्यात घेण्याचा वेग शून्य आहे," अशी थेट टीकाही त्यांनी केली.


दरम्यान, फुलेवाड्यावर आधारित येणाऱ्या हिंदी चित्रपटावर झालेल्या वादावर बोलताना भुजबळ म्हणाले, चित्रपट निर्मात्यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी विविध पुस्तकांच्या आधारे चित्रपट तयार केला असून कोणतीही इतिहासाशी छेडछाड केलेली नाही. आक्षेप असल्यास आम्ही पुरावे सादर करू, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे