India vs Bangladesh : भारताने बांगलादेशला दिला जबर झटका

नवी दिल्ली : भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांचा समुद्राशी थेट संपर्क नाही. ही राज्ये समुद्रासाठी बांगलादेशवर अवलंबून आहेत. या भागात चीनला गुंतवणुकीची संधी आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य बांग्लादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केले. चीन दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बांगलादेशची कोंडी करायला सुरुवात केली आहे. याआधी शेख हसिना सरकार असताना भारतीय विमानतळ, बंदर, रेल्वे आणि महामार्ग वापरुन बांगलादेशला आयात - निर्यात व्यापार करायला परवानगी होती. आता ही परवानगी काढून घेण्यात आली आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद झाल्यामुळे बांगलादेशच्या आयात - निर्यात व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.



भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम विभागाने एक परिपत्रक काढून बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद केल्याचे जाहीर केले आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसची परवानगी देणारे २९ जून २०२० चे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे नव्या परिपत्रकात नमूद आहे.



भारताकडून मिळालेल्या ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसमुळे बांगलादेश आतापर्यंत भूतान, नेपाळ आणि म्यानमार यांच्याशी थेट व्यापार करू शकत होता. हा व्यापार आता अडचणीत सापडणार आहे.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा