रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याज दर घटण्याची शक्यता

नवी दिल्ली : अमेरिकेने जगभरातून आयात केल्या जाणाऱ्या मालासाठी नवे टॅरिफ धोरण लागू केले आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आले. यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन आता सहा टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट सहा टक्के झाल्यामुळे बँका लवकरच कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या दरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याज दरांमध्ये कपात झाल्यास दरमहा भरावा लागणारा हप्ता अर्थात ईएमआय कमी होणार आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा लवकरच कर्जदारांना फायदा होण्याची शक्यता आहे.

?feature=share



रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी नवे पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे रिझर्व्ह बँकेचा बँकांसाठीचा रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन आता सहा टक्क्यांवर आला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पतधोरण जाहीर करण्यात आले त्यावेळी रेपो रेट ६.२५ टक्के निश्चित करण्यात आला होता.



रेपो रेटला पर्चेस रेट किंवा खरेदी दर असेही म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर हा व्याज दर आकारला जातो. जेव्हा रिझर्व्ह बँक हा व्याज दर कमी करते त्यावेळी होणारा फायदा बँका अनेकदा ग्राहकांना देतात. यासाठी बँका ग्राहकांना द्यायच्या किंवा दिलेल्या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या दरांमध्ये कपात करतात.



चलनवाढ आणि अन्नधान्याच्या किंमती या दोन्ही बाबतीत चिंतेची स्थिती नाही. बँका आणि कॉर्पोरेट्सचे ताळेबंद निरोगी आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. शहरी अर्थव्यवस्थाही सुस्थितीत आहे. यामुळे रेपो रेटमधील कपात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी नवे पतधोरण जाहीर करताना व्यक्त केला.
Comments
Add Comment

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन

Stray Dog Menace : रस्त्यांवरील कुत्र्यांचा प्रश्न अखेर सुटणार ? नागरिकांची सुरक्षा की प्राण्यांचे हक्क, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली : देशभरातील गल्लीबोळांमध्ये आणि रस्त्यांवर वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक