इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले आपत्कालीन लँडिंग

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान मृत्यू होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. रविवारी रात्री अशाच एका दुर्दैवी घटनेत इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-वाराणसी विमानात प्रवास करणाऱ्या ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित विमानाचे छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.



सदरील महिला ही उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथील रहिवासी असून सुशीला देवी यांनी मुंबईहून आपला प्रवास सुरू केला होता. मात्र उड्डाणादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने ही माहिती क्रू मेंबर्सनी तात्काळ वैमानिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुरक्षा व आरोग्याच्या काळजीने विमानाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


लँडिंगनंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने सुशीला देवी यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानात त्या वेळी डॉक्टर उपस्थित होते की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात