इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले आपत्कालीन लँडिंग

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान मृत्यू होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. रविवारी रात्री अशाच एका दुर्दैवी घटनेत इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-वाराणसी विमानात प्रवास करणाऱ्या ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित विमानाचे छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.



सदरील महिला ही उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथील रहिवासी असून सुशीला देवी यांनी मुंबईहून आपला प्रवास सुरू केला होता. मात्र उड्डाणादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने ही माहिती क्रू मेंबर्सनी तात्काळ वैमानिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुरक्षा व आरोग्याच्या काळजीने विमानाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


लँडिंगनंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने सुशीला देवी यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानात त्या वेळी डॉक्टर उपस्थित होते की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद