इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले आपत्कालीन लँडिंग

  94

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान मृत्यू होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. रविवारी रात्री अशाच एका दुर्दैवी घटनेत इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-वाराणसी विमानात प्रवास करणाऱ्या ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित विमानाचे छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.



सदरील महिला ही उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथील रहिवासी असून सुशीला देवी यांनी मुंबईहून आपला प्रवास सुरू केला होता. मात्र उड्डाणादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने ही माहिती क्रू मेंबर्सनी तात्काळ वैमानिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुरक्षा व आरोग्याच्या काळजीने विमानाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


लँडिंगनंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने सुशीला देवी यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानात त्या वेळी डॉक्टर उपस्थित होते की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या