Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे २१०० कडे लक्ष! 'या' तारखेपर्यंत मिळणार एप्रिलचा हप्ता

मुंबई : महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना'अंतर्गत (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारने रक्कम वाढवून २१०० करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याकडे लक्ष लागले असून यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, अशी माहिती समोर येत आहे. परंतु अद्यापही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)



लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार?


महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)

Comments
Add Comment

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची

CM Fadnavis's Journey by Vande Bharat Train : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला वन्दे भारतने प्रवास, प्रवासादरम्यान केले फाईल्सचे कामही पूर्ण

मुंबई : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी बाईकवरून विधान भवनात

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.