Weather : कुठे उष्णतेची लाट तर कुठे गारपीटीचा इशारा! पाहा कसे असेल आजचे हवामान

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain Alert) कोसळ्याचे दिसून आले. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आजही देशभरात हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसून येत आहे. हवामान विभागाकडून (IMD) एकीकडे मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे तीव्र उष्णतेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)



हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रातून कमी पातळीपर्यंत चक्राकार अभिसरणाच्या स्वरूपात वाऱ्यांचा उत्तर-दक्षिण प्रवाह सुरू आहे. यामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे खालच्या पातळीवर एकमेकांवर आदळत आहेत. या हवामान गतिविधींमुळे, छत्तीसगड, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणाच्या विविध भागात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहेच्या वेगवेगळ्या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.


तर मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील उभ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ओडिशा, कोकण आणि गोवा, कर्नाटकचा किनारी भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचे मैदान, गुजरातच्या विविध भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update)



उत्तर भारतात तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल


गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात हवामानाचा पारा वाडत असल्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पारा आणखी वाढू शकतो आणि तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊ शकते. यामुळे उत्तर भारतातील बहुतेक भागात पुढील चार ते पाच दिवसांत पारा ४० अंशांच्या पुढे जाऊ शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.



राजस्थानमध्ये पसरणार उष्णतेची लाट


राजस्थानमध्ये हवामानाचा पाराने उच्चांक गाठला असून ५ ते ७ एप्रिल दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांसह उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ३ आणि ४ एप्रिल रोजी, ईशान्येकडील बहुतेक भागात उष्ण आणि दमट हवामानाचा लोकांना नाहक त्रास होणार आहे.

Comments
Add Comment

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट