IPL 2025: जसप्रीत बुमराह कधी करणार पुनरागमन?

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामाची मुंबई इंडियन्स संघासाठी निराशाजनक सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले असून संघाची सलामी जोडी व गोलंदाजीची धारही कमी दिसत आहे. आता संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चितता निर्माण झाल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.


जसप्रीत बुमराह १ एप्रिलपर्यंत मुंबई इंडियन्स संघात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, बुमराहचे आयपीएल २०२५ मध्ये पुनरागमन लांबणीवर पडले आहे. त्याच्या परतण्याची कोणतीही निश्चित तारीख अद्याप ठरलेली नाही.


बुमराहला संघात परतण्यासाठी एप्रिल महिन्याचा मध्य उजाडण्याची शक्यता आहे. याउलट, संघातील दुसरा गोलंदाज आकाशदीप हा १० एप्रिलपर्यंत संघात पुनरागमन करू शकतो, असे समजते आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम होत असून, खेळाडू त्याला लवकरात लवकर संघात पाहण्यास उत्सुक आहेत.

Comments
Add Comment

The 2026 FIFA World Cup final match : स्लाव्हको विन्सिच यांच्याकडे सोपवली महाअंतिम सामन्याची धुरा

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक २०२६ च्या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा करण्यात आली असून,

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.