उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत दररोज सकाळी निवडक पत्रकारांच्या समोर बोलतात. हे पत्रकार राऊतांचे वक्तव्य बातमी म्हणून चालवतात. हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून हा प्रकार सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत उद्धव गटाच्या खासदारांच्या आणि आमदारांच्या संख्येत घट झाली आहे. पक्षाची ताकद कमी होत असली तरी राऊतांचा सकाळी निवडक पत्रकारांसमोर बोलण्याचा शिस्ता अजून मोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी राऊतांवर सडकून टीका केली.
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक ...
उद्धव गटाच्या पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम हाती घेण्याऐवजी राऊत अर्थात स्वयं घोषित विश्वगुरुने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावे, असे चित्रा वाघ यांनी सुनावले. 'भारतीय जनता पार्टी , प्रधानमंत्री मोदीजी वगैरेंवर बोलण्याची एकतर त्यांची कुवत नाही… आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही. भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या पक्षाला माफ करा गटाला पडलेलं खिंडार सांभाळा…' या शब्दात चित्रा वाघ यांनी राऊत नावाच्या व्यक्तीला त्याची पातळी दाखवून दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन मुंबई : औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात लढला. शिवाजी नावाचा विचार त्याला संपवायचा होता. जगभरात औरंजेबाचा इतिहास ...
उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद आमदार असल्याचे भान राखावे, विसर पडू देऊ नये. नाहीतर पक्षाचे अस्तित्व उरणार नाही; असा इशारा चित्र वाघ यांनी उद्धव गटाला दिला.