Ajit Pawar : शरद पवारांचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक निकालाला पाच महिने पण झाले नाहीत तोच शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. मतदारसंघातील कामं व्हावी, विकासाची कामं झपाट्याने व्हावी म्हणून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.



राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या बदल्यात शरद पवार गटाच्या आमदारांना मतदारसंघांतील प्रत्येकी १०० कोटी रुपयांची विकासकामं प्राधान्याने पूर्ण केली जातील,असं आश्वासन मिळाल्याचं वृत्त आहे. हे आश्वासन मिळाल्यापासून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते.



शरद पवार गटाचे दहा पैकी चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील आमदारांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिजीत पाटील (माढा), राजू खरे (मोहोळ), उत्तम जानकर (माळशिरस), नारायण पाटील (करमाळा) हे शरद पवार गटाचे चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे हे चार आमदार आधी गळाला लावण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून सुरू असल्याचे वृत्त आहे.



पक्षांतरबंदी कायद्याची अडचण टाळायची असल्यास अजित पवारांना शरद पवार गटाचे दहा पैकी किमान सात आमदार स्वतःच्या पक्षात आणणे आवश्यक आहे. सोलापूरचे चार आमदार राष्ट्रवादीत आले तर अजित पवार गटाची बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील शरद पवार गटाच्या आमदारांनाच गळाला लावण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.
Comments
Add Comment

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India