PM MODI SPEECH : नागपूरमध्ये मराठीत बोलले पंतप्रधान मोदी, भाषणात काय म्हणाले ?

नागपूर : गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा... आजपासूव नवरात्राचे पवित्र पर्व सुरू होत आहे. देशातील कानाकोपऱ्यात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. नागपूरमध्ये आज माधव नेत्रालयाच्या रुपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा. देशातील सर्व गरिबातील गरिबाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत ही प्राथमिकता आहे. देशातील ज्येष्ठ लोकांना त्यांच्या उपचाराची चिंता नसली पाहिजे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आयुषमान भारत योजनमुळे लाखो लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी मराठी भाषेत गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.



हा दिवस आपल्या प्रेरणास्रोत, परम आदरणीय डॉक्टर साहेबांच्या जयंतीचा देखील आहे. या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली प्रवासाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जर आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर शेकडो वर्षांच्या गुलामगिरी आणि आक्रमणांदरम्यान, भारताची सामाजिक रचना नष्ट करण्याचे क्रूर प्रयत्न झाले. पण भारताची जाणीव कधीच संपली नाही, त्याची ज्योत तेवत राहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.



गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी संघाच्या स्वयंसेवकांना नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज १०० वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. आम्ही केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केली नाही तर एम्स संस्थांची संख्याही वाढवली आहे. अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय जागांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. देशातील गरीब मुलांना डॉक्टर बनता यावे यासाठी, आम्ही पहिल्यांदाच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण दिले आहे जेणेकरून ते कोणत्याही भाषेच्या अडथळ्याशिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद