Alphanso Mango : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची यूरोप,अमेरिका स्वारी!

५० हजार पेट्यांची मुंबईतून निर्यात


मुंबई : गुढीपाडवाच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2025) रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या (Alphanso) ५० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. स्थानिक बाजारेपेठेत गुढीपाडव्यामुळे आंब्याला चांगली मागणी होती. हापूस आंब्यांच्या पेटीला २ ते ५ हजार एवढा दर होता.



कोकणातूनच ४० हजार पेट्या आंबा


गुढीपाडवा मुहूर्त साधत कोकणातील आंबा (Konkan Mango) उत्पादक शेतकरी मार्केटमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी पाठवत असतात. रविवारी देखील मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांचा ४० हजार ३६४ पेट्या दाखल झाल्या. तसेच इतर राज्यातील १० हजार ५१८पेट्या दाखल झाल्या आहेत. दरवर्षी या प्रमाणात पेट्या मार्केटमध्ये दाखल होत असतात. विशेष म्हणजे कोकणचा हापूस निर्यात होण्यास सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असते.



किरकोळ बाजारात दर चढेच


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.यामुळे आंब्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गुढीपाडव्या दरम्यान आंब्यांची पेटी २५०० ते ३००० रुपयांना मिळत होती. यंदा हे दर ३,५००ते ४,०००रुपये आहे. तसेच एका डझन हापूस आंबा ९०० ते १,५०० रुपये डझन मिळत आहे.



अवकाळीचा आंबा पिकाला फटका


कोकणची अर्थव्यवस्था आंब्या पिकावर आहे. परंतु लहरी निसर्गाचा फटका आंब्यांला सध्या बसत आहे. सध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आल. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हापूस आंब्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. केवळ २५ ते ३०टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागातदार मेटाकुटीला आला आहे.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक